मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठीचे ठरले नवे समीकरण – Maharashtra Times

शारजाह: आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये खेळणारा चौथा संघ कोणता असेल याचा निर्णय अजून झालेला नाही. साखळी फेरीत आता फक्त ४ लढती शिल्लक आहे. त्यातील आज होणाऱ्या दुसऱ्या लढतीत किंवा उद्या होणाऱ्या लढतीत प्ले ऑफचे चित्र स्पष्ट होणार आहे. आयपीएलच्या चाहत्यांचे विशेषत: गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे लक्ष आज होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सकडे लागले आहे. हा सामना मुंबईचे आव्हान कायम राहणार की संपुष्टात येणार हे ठरवणार आहे.

वाचा-

आयपीएलच्या १४व्या हंगामात आज दोन लढती होणार आहे. पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. पहिल्या लढतीमुळे गुणतक्त्यात फार फरक पडणार नसला तरी दुसऱ्या लढतीचा परिणाम गतविजेत्यावर होऊ शकतो. कोलकाता आणि राजस्थान याच्या लढतीनंतर मुंबईचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. गुणतक्त्यात केकेआर १२ गुणांसह चौथ्या तर मुंबई तितक्याच गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबईचे नेट रनरेट केकेआरपेक्षा कमी आहे. त्यामुळेच प्ले ऑफमधील चौथे स्थान त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे. आज केकेआरचा पराभव झाल्यास मुंबईला मोठी संधी मिळू शकते. पण त्यांचा विजय झाल्यास मुंबईला भव्य विजय मिळवण्याची कामगिरी करावी लागेल. जाणून घेऊयात प्लेऑफचे नवे गणित कसे आहे ते….

वाचा- Video: असा कॅच आजवर कोणीच घेतला नाही; पाहा ३८ वर्षीय खेळाडूने काय केले

केकेआर

-गुणतक्त्यात कोलकाता चौथ्या स्थानावर असून त्याची सरासरी मुंबईपेक्षा चांगली आहे. आज होणारी अंतिम साखळी लढत जिंकून ते प्लेऑफमध्ये जागा पक्की करू शकतात. पण त्याच बरोबर हैदराबादने उद्याच्या लढतीत मुंबईचा पराभव करणे त्यांच्यासाठी गरजेचे असेल.

-आज केकेआरचा पराभव झाल्यास आणि उद्या मुंबईचा पराभव झाला तरी सरासरीच्या जोरावर केकेआर प्लेऑफमध्ये जाऊ शकते

– प्लेऑफमधील चौथा संघ फक्त या दोन लढतीवर नाही तर चेन्नई आणइ पंजाब या सामन्याच्या निकालावर लागू शकते. आज पंजाब आणि राजस्थानने विजय मिळवल्यास गुणतक्त्यात ४ संघांचे प्रत्येकी १२ गुण होतील. असा परिस्थितीत नेट रनरेटवर चौथा संघ ठरेल.

-केकेआरसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे त्याचे नेट रनरेट सर्वाधिक आहे. त्यामुळे प्लेऑफमधील त्याची दावेदारी पहिली असेल.

वाचा- कोलकाता विरुद्ध राजस्थान; मुंबई इंडियन्स आव्हान ठरवणारी लढत

मुंबई इंडियन्स

-आज केकेआरने विजय मिळवल्यास मुंबईला हैदराबादविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागू शकते. याचे अचूक गणित काय असेल ते आज केकेआरचा विजय झाल्यानंतर समजेल.

– केकेआरने विजय मिळवल्याल मुंबईला किती विकेटनी आणि किती षटकात विजय मिळवायचा किंवा किती चेंडू राखून विजय मिळवयाचा हे निश्चित होईल.

वाचा- सनरायझर्सने RCBला दिला पराभवाचा धक्का; सामना गमवून विराटच्या संघाने केली मोठी चूक

– आज केकेआरचा पराभव झाल्यास उद्या हैदराबादविरुद्ध मुंबईला फक्त विजय पुरेसा ठरले. या परिस्थितीत केकेआरचे १२ गुण तर मुंबईचे १४ गुण होतील.

– याउलट केकेआरने विजय मिळवल्यास मुंबईला हैदराबादविरुद्ध किमान ११ षटके राखून किंवा ९० धावांच्या फरकाने सामना जिंकावा लागले.

वाचा- हर्षल पटेलने केली कमाल; बुमराहचा विक्रम मोडला आणि झाला नंबर वन

– मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर केकेआरच्या पराभवाची प्रार्थना करावी लागले. तसेच झाले नाही तर हैदराबादविरुद्धची लढत प्रचंड मोठ्या फरकाने जिंकावी लागले.

वाचा- Video: असा कॅच आजवर कोणीच घेतला नाही; पाहा ३८ वर्षीय खेळाडूने काय केले

पंजाब

– एखादा चमत्कार यांना प्ले ऑफमध्ये पोहचवू शकतो. आज चेन्नई विरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचे १२ गुण होतील.

– आजच्या लढतीत राजस्थानचा विजय आणि उद्या मुंबईचा पराभव झाल्यास पंजाबला प्ले ऑफची लॉटरी लागू शकते. पण यासाठी अट म्हणजे केकेआरचा मोठा पराभव होय.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/how-can-mumbai-indians-reach-the-playoffs-this-is-new-equation/articleshow/86833013.cms