मुंबई बातम्या

मुंबई-पुणेकरांचा श्वास कोंडला! चार वर्षांनंतर प्रथमच उद्भवली अशी स्थिती, कारण समोर – Maharashtra Times

पुणेः हिवाळा सुरू होताच वायू प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन मोठ्या शहरांतून चिंता व्यक्त करणारी बातमी समोर येत आहे. यंदा १ नोव्हेंबर ते डिसेंबर ५ या कालावधीत मुंबई- पुणे या शहरांची चार वर्षांतील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत नोंद झाली आहे. (Mumbai Air Quality)

२०१९मध्ये दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रस्थानी होती. हिवाळ्यात दिल्लीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ व्हायची, असं सफर आणि आयआयटीएम या दोन संस्थांनी नोंदवलं होतं. आता या यादीत मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाही समावेश झाला आहे. या वर्षी १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत तिन्ही शहरांमधील सरासरी प्रदूषक PM10 आणि PM2.5 आहे. तर, आत्ताच्या आकडेवारीनुसार दिल्लीत PM2.5 ची पातळी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत२३% कमी झाली आहे.

IITM-SAFAR च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये बांधकाम आणि पाडकामांवर निर्बंध घातल्यामुळं दिल्लीत हिवाळ्यात प्रदूषणाची सरासरी पातळी कमी होऊ शकते, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार उत्तर भारतातील काही भागांमध्येही पेंढ्यांना आग लागल्याचे प्रमाण कमी झाले आहे, असंही ते म्हणाले.

वाचाः बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

१५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील एनसीआर जिल्ह्यांमध्ये जंगलात वणव्यांच्या संख्येत घट झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

IITM-SAFAR डेटावरून असे दिसून आले आहे की, या वर्षीच्या हिवाळ्यात आतापर्यंत, पुण्याची सरासरी PM10 निर्देशांक १२३ ug/m3 होता, जो मागील वर्षी याच कालावधीत ८२ ug/m3 आणि २०२० मध्ये १०३ ug/m3 होता. शहराचा सरासरी PM2.5 निर्देशांक २०२१मध्ये ५१ ug/m3 आणि २०२० मध्ये ६६ ug/m3 च्या तुलनेत या वर्षाच्या कालावधीत ८० ug/m3 वर पोहोचला आहे.

वाचाः मुंबईचा कायापालट!, ‘मिशन मोड’वर काम हाती घेण्याचे CM एकनाथ शिंदे यांचे निर्देश

या हिवाळ्यात पुणे आणि मुंबईत वाहणारे संथ वारे देखील प्रदूषणाला कारणीभूत ठरू शकतात. “दिल्लीतील वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तेथील प्रदूषकांचा प्रसार होण्यास मदत झाली असावी. मुंबईतील सध्याच्या हंगामात आर्द्रतेच्या उच्च पातळीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ प्रदूषकांचे प्रमाण वाढू शकते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

थंडीमध्ये जमिनीलगतचे तापमान थंड असते त्यामुळे जमिनीलगतचा हवेचा थर हा वरच्या थराच्या तुलनेत थंड असतो. मधला थर हा तुलनेने उष्ण असतो. जमिनीलगतचा थर हा थंड असल्याने इतर वेळी दिसणारे उष्ण हवा वर जाणे आणि थंड हवा खाली येणे हे चक्र थांबते. हवेच्या दोन थरांमध्ये अपेक्षित देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे प्रदूषके या थरामध्ये अडकून राहतात.

वाचाः फुरसुंगी-उरुळी पुणे महापालिकेतून बाहेर; आता ‘या’ गावानंही केली मोठी मागणी

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMigQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL211bWJhaS1hbmQtcHVuZS1zZWUtbW9zdC1wb2xsdXRlZC13aW50ZXItaW4tNC15ZWFycy9hcnRpY2xlc2hvdy85NjA3NDg3Ni5jbXPSAYUBaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy9tdW1iYWktYW5kLXB1bmUtc2VlLW1vc3QtcG9sbHV0ZWQtd2ludGVyLWluLTQteWVhcnMvYW1wX2FydGljbGVzaG93Lzk2MDc0ODc2LmNtcw?oc=5