मुंबई बातम्या

Mumbai : कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून ट्विटरचा प्रभावी वापर, ‘असा’ केला आव्हानांचा – ABP Majha

मुंबई : कोरोना काळात (Coronavirus)  सोशल मीडिया (Social Media) हे संवादाचे प्रभावी सधान बनले.  सोशल मीडिया कोरोना काळात वरदान ठरले.  कोरोना काळात वैद्यकीय यंत्रणेवर येणारा प्रचंड ताण, रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड तसेच औषधांची मोठ्या प्रमाणावर गरज पूर्ण करण्यात सोशल मीडियाचा मोठा हातभार लावला आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता सोशल मीडियाने योगदान महत्त्वपूर्ण आहे. ट्विटरच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला मुंबईकरांशी सहज संवाद साधणे सोपे गेले. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेला ट्विटरच्या कसा फायदा झाला याविषयी  मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी माहिती दिली आहे.  

कोरोना महामारीच्या काळात प्रभावी प्रशासन चालविण्यासाठी ट्विटरने बीएमसीला कशी मदत केली?

लोकांशी तसेच वेगवेगळ्या कार्यालयांसोबत ताज्या अपडेट्सनी जोडण्यात ट्विटरचा वापर चांगल्या आणि सकारात्मक पद्धतीने झाला. लोकांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यामध्ये ट्विटरचा उपयोग झाला. रुग्णालयातील कोरोना बेड्स, लसींची माहिती, कोरोना काळात घ्यावयाची काळजी, प्रोटोकॉल्स याचसोबत कोरोनाच्या रोजच्या रुग्णांची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात येत होती. इतर माध्यमांची तुलना करता ट्विटर अधिक उपयोगी ठरलं.

BMC ने 2019 मध्येच ट्विटरचा सक्रियपणे वापर करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी सुशासन आणि नागरिकांच्या कल्याणाचा प्रश्न येत होता त्यावेळी त्याचा उपयोग कसा झाला?

लोकांशी जोडण्याचा हा एक मल्टिप्लॅटफॉर्म होता आणि याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आला. याचा वापर त्या आधीही करण्यात येत होता, पण लोकांना समोरं जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज होणं महत्त्वाचं समजत होतो. आमच्या क्षमतेनुसार सोशल मीडियाद्वारे नागरिकांची सेवा करण्यास सक्षम असण्याची खात्री बाळगली पाहिजे.  आमचा विश्वास आहे की, या प्लॅटफॉर्मवर सक्रिय होण्यापूर्वी घालवलेला वेळ आणि विचार यामुळे त्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. तेव्हापासून ते अखंडपणे कार्यरत आहे.

सोशल मीडियाच्या काळात शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये कसा बदल झाला आहे?

शासन निश्चितच बदललं आहे आणि हा बदल सकारात्मक आहे. आमच्या कामासाठी यामुळे जागतिक दृष्टिकोन प्राप्त झाला. लोकांशी यामुळे कनेक्ट राहता आलं आणि लोकांमध्ये शासनाला आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या काम करताना कोणत्या आव्हानाला सामोरं जावं लागतं याबद्दल जागरूकता निर्माण करता आली. यामुळे सेवा प्रदान करताना ती सुलभ होऊ शकली आणि अधिक उत्तरदायित्व होऊ शकली.

@mybmc च्या ट्विटर हँडलशिवाय, संपूर्ण शहरात प्रशासकीय प्रभागांची 24 खाती आहेत. नागरी समस्या वेळेवर सोडवल्या जाव्यात आणि काम अधिक प्रभावी व्हावं यासाठी यासाठी BMC काय करत आहे?

 24 कर्मचाऱ्यांना 24 वॉर्डांच्या हँडलसाठी नियुक्त करण्यात आलं आहे. या सर्वावर एक नोडल अधिकारी थेट देखरेख करतो. त्यांच्या संबंधित हँडलवर प्राप्त झालेल्या सर्व समस्या संबंधित जबाबदार अधिकार्‍यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करणे ही त्यांची जबाबदारी आहे. सर्व गोष्टीना संबंधित अधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे आणि हँडलचे शेड्यूलनुसार दररोज परीक्षण केले जाते आणि डेटा रेकॉर्ड केला जातो. सर्व शंकांचे समाधान होईल याकडे लक्ष दिलं जातं.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासन चालवताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला?

काहीवेळा सोशल मीडियाद्वारे मिळालेली माहिती अपूर्ण असते आणि त्यावर अधिकची माहिती मिळवणे आवश्यक असते. असं असलं तरी सोशल मीडियाचा टू वे कम्युनिकेशनचे माध्यम म्हणून वापर करता येतो. त्यातून follow अप घेता येतो आणि अधिक स्पष्टता मिळते. यातील आणखी एक आव्हान म्हणजे आम्हाला प्राप्त होणाऱ्या प्रश्नांची संख्या आणि नागरी समस्यांची विविधता. परंतु ट्विटर हँडलच्या विकेंद्रीकरणामुळे नागरिक आणि शासन यांच्यात समन्वय साधण्यास मदत झाली आहे.

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-effective-use-of-twitter-by-mumbai-municipal-corporation-during-corona-period-faced-challenges-1104614