मुंबई बातम्या

मुंबई शहराचे होणार सुशोभीकरण; 240 कोटींच्या आराखड्याला मंजुरी – Sakal

मुंबई : मुंबई शहर (Mumbai city) जिल्ह्याच्या 2022-23 या आर्थिक वर्षाच्या 240 कोटी (Development plan) रुपयांच्या प्रारुप आराखड्याला आज जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. नियोजन विभागाने 124 कोटी 48 लाख 60 हजार रुपयांची मर्यादा मुंबई शहरासाठी दिली होती. त्यात, शहराच्या सुशोभीकरणासाठी (Mumbai city Beautification) 115 कोटी 51 लाख 40 हजार रुपयांच्या अतिरीक्त मागणीसह 240 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मंजरी देण्यात आली. मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा: निर्देशांकांची घसरण थांबली; सेन्सेक्स 113 अंश वाढला

फेरीवाल्यांसाठी विशेष धोरण तयार करण्यात येत असल्याचे अस्लम शेख यांनी यावेळी नमूद केले. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे, खासदार,आमदारांसह मुंबई जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, महानगरपालिका, एम.एम.आर.डी.ए., म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थीत होते.

अतिक्रमण मुक्त पदपथ

मुंबईत जी जी महत्त्वाची स्थाने आहे, त्या त्या ठिकाणाचा विचार करून त्या स्थानांचे सुशोभीकरण तसेच त्याचा विकास करण्यात येत आहे. यात कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता प्राधान्याने ही कामे करण्यात येतील. मुंबई शहरातील पादचारी रस्ते मोकळे करण्यात येतील तसेच फेरिवाल्यांकरिता एक विशेष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फुटपाथावर कोणीही आतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.

आपणास मुंबई व्यवस्थित चालवायची असल्याचे अस्लम शेख यांनी नमूद केले. पर्यटन स्थळाच्या दृष्टीने 100 वर्षाचा इतिहास असलेल्या मंदिराचा ‘क’ वर्गाच्या दृष्टीने समावेश करण्यात यावा. धारावीत 2004 पासून विकास सुरू असून आता तिथे खुल्या जागा नाही. अशा जागा महानगरपालिकेने निश्चित करून तेथे मुलांसाठी अभ्यासिका आणि उद्यान करण्याची मागणी यावेळी प्रा.गायकवाड यांनी यावेळी केली.

हेही वाचा: परमबीर सिंह खंडणी प्रकरणात विनय सिंहला अटक

मराठी अनिर्वाय

कोविड काळात धारावी मॉडेलच्या कामगिरीचे कौतुक देशभरातून झाले आहे. मुंबईत प्रत्येक जाती धर्माचे लोक राहत असून या सगळ्याना घेऊन मुंबईचा विकास करायचा आहे. जी जी कामे हाती घेण्यात आली आहे, ती पूर्ण करण्यात येत असून विकासकामांची आम्ही गती सोडली नाही. सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन आपण कामे करत आहोत. मुंबईतील पालिकेच्या 11 शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची मान्यता मिळाली असून 1232 शाळांना अपग्रेड करत आहोत. प्रत्येक बोर्डामध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला असून आयसीएसई आणि कॅम्ब्रीज शाळांमधून मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त ‘सहल मुंबईची’ या मार्गदर्शक पुस्तिकेसह मोबाईल ॲपचे प्रसारण शेख यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय जमिनीवरील इमारतीमधील गाळे व सदनिका हस्तांतरणाची परवानगी ऑनलाईन देण्यासाठी संगणक आज्ञावली तयार करण्यात आली असून मुंबई शहर जिल्ह्यातील 19 महसूल विभागातील सर्व 26 हजार 675 मिळकत पत्रिका डिजिटल स्वाक्षरीत करण्यात आल्या आहेत.

हाजीअली दर्गा -2021-22 निधीतून हाजी अली दर्ग्यामध्ये सोयीसुविधा व सौंदर्यीकरण प्रस्तावित असून या कामासाठी प्रकल्प सल्लागार नेमण्यात आला. शिवडी किल्ला – शिवडी किल्यामध्ये सौंदर्यीकरण व पर्यटकांसाठी सोयीसुविधा पुरविण्यात येत असून पुरातत्व विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट व वन विभाग यांच्या समन्वयाने आराखडा अंतिम टप्प्यात आर्चरी सेंटर – कामगार कल्याण केंद्र मुंबई येथे आर्चरी ट्रेनिंग सेटर व 10 मीटर रायफल शुटींग रेंज उभारण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले असून या कामांना लवकरच मंजुरी देण्यात येईल.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-city-beautification-development-plan-permission-granted-aslam-shaikh-aditya-thackeray-varsha-gaikwad-nss91