मुंबई बातम्या

IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध आज कोलकाताचे काही खरे नाही, हे आहे कारण… – Maharashtra Times

चेन्नई:आयपीएल २०२१ मध्ये आज पाचवी लढत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. स्पर्धेत या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला असून यात मुंबईने RCB विरुद्ध पराभव तर कोलकाताने सनरायझर्सवर विजय मिळवला.

वाचा- रोहित शर्मा आता फक्त फलंदाज आणि कर्णधार नाही, तर…; पाहा व्हिडिओ

मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल तर कोलकाताची नजर दुसरा विजय मिळून गुणतक्तात अव्वल स्थानी झेप घेण्याची असेल. या दोन्ही संघातील आतापर्यंतची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्स अधिक मजबूत दिसतो. या दोन्ही संघात गेल्या १२ लढतीत कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघात २७ लढती झाल्या असून त्यात मुंबईने २१ सामन्यात विजय मिळवला आहे.

वाचा- IPL 2021: संजू सारखा कोणी नाही; हंगामातील पहिल्या शतकासह केला अनोखा विक्रम

गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये मुंबईने साखळी फेरीत कोलकाताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघातील गेल्या पाच सामन्यात कोलकाताने फक्त एकात विजय मिळवला आहे. यामुळे आजच्या लढतीत देखील मुंबईचे पारडे जड असणार आहे.

वाचा- IPL 2021 Points Table: प्रत्येक संघाचा एक मॅच झाली; पाहा टॉप चार आणि तळातील चार संघ

पहिल्या लढतीत पराभव झाल्याने मुंबई इंडियन्स विजयासाठी जोरदार प्रयत्न करेल. तर हैदराबादवरील विजयाने कोलकाताचा आत्मविश्वास वाढला असेल.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2021-mumbai-indians-vs-kolkata-knight-riders-match-preview/articleshow/82045711.cms