मुंबई बातम्या

यूजीच्या काही विद्यार्थ्यांसाठी IIT मुंबई कॅम्पस उघडण्याची शक्यता – Maharashtra Times

IIT Bombay Campus: आयआयटी मुंबई काही पदवीच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या काही विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस उघडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची प्रयोगशाळेची आवश्यकता, इच्छा लक्षात घेऊन त्यांना कॅम्पसमध्ये येण्याची परवानगी देण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ पीएचडी आणि एमटेकच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच कॅम्पसमध्ये येण्याची परवानगी आहे. करोना महामारीमुळे गेले अनेक महिने केवळ ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.

फायनल सेमिस्टरला प्रयोगशाळेतील काम फार नाही, मात्र ज्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहे, त्यांना कॅम्पसमधील साधनांची आवश्यकता भासू शकते, अशी माहिती एका प्राध्यापकांनी दिली. काही विद्यार्थी त्यांचे प्रकल्प सिम्युलेशनद्वारे देखील मॅनेज करत आहेत, मात्र काहींना प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील कामावर अवलंबून राहण्याची गरज असते. या विद्यार्थ्यांची संख्या कमी असू शकेल, पण मर्यादित स्वरुपात का होईना संस्था काही विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये येण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे.

काही विद्यार्थी असे देखील आहेत, जे दूर्गम भागात राहतात आणि त्यांना ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहण्यात अडचणी येत आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वीजपुरवठ्याच्या समस्या आहेत. जर अशा विद्यार्थ्यांना कॅम्पसचा वापर करायचा असेल तर संस्था त्यांचा विचार करू शकते, असे एका प्राध्यापकांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले. जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सत्राबाबत संस्थेची सिनेट लवकरच निर्णय घेणार आहे.

GATE 2021: परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची शेवटची संधी

‘रामानुजन गणितज्ञ पुरस्कार’ यंदा प्रथमच विदेशी व्यक्तीलाआयआयटी मुंबईचे संचालक सुभाषिष चौधरी यांनीदेखील काही विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस उघडण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे. विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाला प्रोजेक्टवर काम करायचं आहे, त्यांच्यासाठी कॅम्पस खुले होण्याची शक्यता आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक असेल. शिवाय आयआयटी मद्रासशी याबाबत सल्लामसलत करण्यात येणार आहे. कारण तेथे कोविड केसेस वाढल्यामुळे कॅम्पस बंद करण्यात आलं होतं.

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/iit-bombay-may-allow-campus-for-some-ug-final-year-students/articleshow/79755562.cms