मुंबई बातम्या

पालकांची चिंता वाढवणारी बातमी, मुंबईत मुलांमध्ये वाढतोय ‘टीबी’चा धोका, ही काळजी घ्या – Maharashtra Times

मुंबईः लहान मुलांमध्ये टीबीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आलं आहे. शहरात प्रत्येकी दहा टीबीच्या रुग्णांमागे एका मुलाला टीबीचा संसर्ग झाल्याचे आत्तापर्यंतच्या अहवालात दिसून आलं आहे. टीबीचे रुग्ण वाढत असले तरी अद्याप बालरोग क्षय रुग्णांसाठी समर्पित असलेले आयसीयू सुरू करण्यात आले नाहीयेत. पुढील आठवड्यात आयसीयू सुरु करणार असल्याची शक्यता आहे.

बीएमसीने २०२२मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुलांमध्ये क्षयरोगाची प्रकरणे प्रत्येक वर्षात वाढत आहेत. २०१९ मध्ये एकूण ७% होते ते २०२१ मध्ये हे प्रमाण वाढून ९% झाले आहे. मुंबईत दरवर्षी ६०,००० नवीन टीबी रुग्णांची नोंद होते, असं एका आरोग्य कार्यकर्त्याने म्हटलं आहे.

मुलांमधील टीबीचे वाढते प्रमाण पाहून परळमधील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील बाल क्षय रुग्णांसाठी येथे विशेष विभाग आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, विभागात आठ खाटांचे टीबी आयसोलेशन युनिट व दोन ICU बेडसह विस्तारित करण्यात येणार आहे. मुलांसाठी समर्पित आयसीयू तयार करणारे आमचं कदाचित देशातील पहिलं रुग्णालय आहे,” असे सीईओ डॉ मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

वाचाः पत्नी मुलांसह गाढ झोपली होती, रात्री नको ते घडलं, पतीला ‘त्या’ अवस्थेत पाहून हंबरडा फोडला
वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलमधील टीबी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. इरा शाह यांनी सांगितले की, याक्षणी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे मुलांमध्ये प्रतिजैविकांना प्रतिरोध करणारा क्षयरोग वाढणे. हे गंभीर आहे असं दिसून येत आहे. या क्षणी अशी पाच मुलं डॉ. इरा यांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत.

गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये बीएमसीच्या टीबी कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे डॉ. विकास ओसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, निदान योग्य होत असल्याने व सुविधांमुळे टीबीच्या बालरुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. “आम्ही अधिक चाचण्या करत आहोत, ज्यामुळे प्रकरणांमध्ये वाढ होतेय, असं त्यांनी म्हटलं आहे. टीबीचे रुग्ण वाढल्यामुळं आरोग्य प्रशासनही अलर्ट झालं आहे. त्यामुळं आरोग्य विभागाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. BMC सार्वजनिक आरोग्य विभागाने शिवडी येथे टीबीच्या रुग्णांसाठी २० खाटांचा मुलांसाठी वॉर्ड सुरू करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

वाचाः इथोपियाचा हायले लेमी मुंबई मॅरेथॉनचा विजेता, तर, भारतीयांमध्ये गोपी टीने जिंकली मॅरेथॉन

बर्‍याचदा, टीबी असलेल्या मुलांना इतर रोगाचे संक्रमण देखील होऊ शकते. त्यांच्यावर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असते. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बाल क्षयरोग रुग्णांसाठी खाटा वाढविण्याची नितांत गरज आहे, आरोग्य कार्यकर्ता गणेश अचार्य यांनी म्हटलं आहे.क्षयरोग शरीराच्या बहुतेक भागांवर परिणाम करू शकतो, परंतु हा फुफ्फुसाचा टीबी आहे जो अत्यंत संसर्गजन्य आहे. एका रुग्णाने एका वर्षाच्या आत १५ जणांना हा रोग पसरवला आहे. मला क्षयग्रस्त मुलासाठी बेड शोधत असलेल्या पालकांकडून फोन येतात, परंतु रुग्णालयात खाटांची कमी असल्याने त्यांना मदत करणे अशक्य आहे. मग त्यांना नर्सिंग होमकडे जावे लागते आणि भरपूर पैसे खर्च करावे लागतात, असं आचार्य म्हणाले.

वाचाः १४ तारखेला येणारी मकर संक्रांत आता १५ ला का साजरी केली जाते?; वैज्ञानिकांनी सांगितलं कारण

टीबी होण्याची कारणे

प्रदूषण, अस्वच्छता, सकस आहाराचा अभाव, औषधांचा अतिवापर यामुळे एक्सडीआर आणि टीडीआर म्हणजे प्रतिजैविकांना प्रतिरोध करणारा व कोणत्याही औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे प्रमाण लहान मुलांमध्ये वाढते आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे मागील पाच वर्षांत शून्य ते बारा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दमा, खोकला, धाप लागणे, श्वसनमार्गाचे आजार बळावले आहेत.

काळजी घ्या

-लवकर निदान

-योग्य टिश्यूची तपासणी

– औषधोपचार पूर्ण करणे

-टीबीची धास्ती घेऊ नका

– मुलांची रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार द्या.

-चुकीच्या प्रतिजैविकांचा मुलांवर मारा करू नका.

-संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहू नका

– लक्षणे असतील, तर घरगुती उपाय करू नका.

-कौटुंबिक आरोग्याची माहिती द्या.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifmh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvY2hpbGRyZW4tcmVwb3J0aW5nLXdpdGgtc2V2ZXJlLWRydWctc2Vuc2l0aXZlLXRiL2FydGljbGVzaG93Lzk3MDAzNjY3LmNtc9IBggFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2NoaWxkcmVuLXJlcG9ydGluZy13aXRoLXNldmVyZS1kcnVnLXNlbnNpdGl2ZS10Yi9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTcwMDM2NjcuY21z?oc=5