मुंबई भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे. मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष आशुतोष ठाकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पत्र त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.
आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी,
मेरे लिए आप सर्वोच्च हैं, मेरी निष्ठा पार्टी के प्रति सदैव रहेगी
पर मैं @BJYM4Mumbai के उपाध्यक्ष पद एवं पार्टी की प्राथमिक सदस्यता से दिए गए कारणों की वजह से इस्तीफा देता हु।
जो मेरे साथ आज अतुल भातखलकर जी के कार्यालय पर हुआ वो निंदनीय है! pic.twitter.com/oYKgSYzYU7— Ashutosh Thakar – आशुतोष ठाकर 🇮🇳 (@ashutoshthakar_) August 26, 2021
त्यांनी आपल्या Tweet मध्ये म्हटलं की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, होय, माझ्यासाठी तुम्ही सर्वोच्च आहात. पक्षाशी माझी निष्ठा नेहमीच राहील. पण मी दिलेल्या कारणांमुळे भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. अतुल भातखळकर जी यांच्या कार्यालयात आज जे घडले ते निंदनीय आहे!
या राजीनामा पत्रात आशुतोष यांनी आमदार अतुल भातखळकर यांच्या चुकीच्या वागणुकीचाही आरोप केला आहे. आशुतोष हे जेव्हा भातखळकर यांच्या कार्यालयात गेले त्यावेळी घडलेला सर्व प्रकार त्यांनी आपल्या पत्रात लिहिला आहे.
हेही वाचा- Success Story: रिक्षाचालकाच्या मुलीनं जग जिंकलं; कोल्हापूरच्या अमृताला जागतिक कंपनीनं दिलं 41 लाखांचं पॅकेज
एवढंच काय तर मी गुजराती आहे म्हणून माझा अपमान केला आहे, असे त्यांनी राजीनामा पत्रात मुंबईचे विद्यमान अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना सवाल केला आहे.
आशुतोष ठाकर यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये गुजराती विरुद्ध मराठी अशी अंतर्गत गटबाजी सुरु असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार पंतप्रधान मोदी यावर काय करणार हे बघावं लागेल.
Published by:Pooja Vichare
First published:
Source: https://lokmat.news18.com/mumbai/internal-factionalism-in-mumbai-bjp-vice-president-of-bjym-ashutosh-thakar-resignation-mhpv-597542.html