Devendra Fadnavis : ‘सकाळ सन्मान सोहळा’ या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी उपस्थिती लावली. मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी त्यांची फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईचा विकास या बद्दल सरकारचे नियोजन यावर सविस्तरपणे आढावा सांगितला.
फडणवीस म्हणाले, “तीनच वर्षात मुंबई बदललेली असेल. मेट्रो २ आणि मेट्रो ७ सुरू केली. पहिल्याच दिवसापासून त्याच्यातून लाख लाख प्रवासी प्रवास करत आहेत. इंटीग्रेशन आपण जे करतोय . मेट्रो ३ भुयारी मार्ग ४० किलोमीटरची आहे. ज्यावर खूप वाद सुरू आहे, आणि उद्धव ठाकरे सोबत बराच संघर्ष चालू होता. तीन वर्षे त्यांनी ती अडकून ठेवली होती. मात्र आता मार्ग मोकळा झाला, पुढच्या वर्षापर्य़ंत आम्ही ती सुरू करू. इंटरलँडला २२ किलोमीटरचा ब्रीज हा जोडला जाईल, अक्षरश: एक नवीन मुंबई, म्हणजे आताच्या मुंबईपेक्षा चार पट अशी मुंबई, ही चौथी मुंबई समजून घ्यावी आपण. चौथी मुंबई तयार करू. ही मुंबई भारताचा जो पुढचा ग्रोथ आहे असेल, असे फडणवीस म्हणाले.
Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifmh0dHBzOi8vd3d3LnNhcmthcm5hbWEuaW4vbXVtYmFpL2RldmVuZHJhLWZhZG5hdmlzLXRoZS1mYWNlLW9mLW11bWJhaS13aWxsLWNoYW5nZS1pbi10aGUtbmV4dC10aHJlZS15ZWFycy1mYWRuYXZpc3MtY2xhaW0tY3o5MdIBiAFodHRwczovL3d3dy5zYXJrYXJuYW1hLmluL2FtcC9zdG9yeS9tdW1iYWkvZGV2ZW5kcmEtZmFkbmF2aXMtdGhlLWZhY2Utb2YtbXVtYmFpLXdpbGwtY2hhbmdlLWluLXRoZS1uZXh0LXRocmVlLXllYXJzLWZhZG5hdmlzcy1jbGFpbS1jejkx?oc=5