मुंबई बातम्या

Climate Change: मायानगरी मुंबईसह ही शहरे समुद्र गिळंकृत करणार? काय आहे भविष्यातील धोका? जाणून घ्या – Saam TV (साम टीव्ही)

चक्रीवादळं वाढतील

2050 पर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली तर या चक्रीवादळ आणि वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. ती तीन पटीने वाढू शकते.

2050 पर्यंत चेन्नईतील 5 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि 55 इमारतींना समुद्राच्या पुराचा सामना करावा लागेल. तसेच कोचीमध्ये समुद्राच्या पुरामुळे किमान 464 इमारती प्रभावित होतील. भरतीच्या काळात 1502 इमारती बाधित होतील. तिरुअनंतपुरममध्ये 349 ते 387 इमारतींचे नुकसान होणार आहे. विशाखापट्टणममध्ये 9 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि 206 इमारती बाधित होणार आहेत.

भारतातील ही 12 ठिकाणे सर्वाधिक धोक्यात

2100 वर्षापर्यंत सर्वात जास्त धोका असलेल्या ठिकाणांमध्ये मुंबई, भावनगर, कोची, मुरगाव, ओखा, तुतीकोरीन, पारदीप, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, कांडला यांचा समावेश आहे. 2100 पर्यंत भारतातील 12 किनारी शहरे सुमारे 3 फूट पाण्याखाली जातील. हा अभ्यास अमेरिकन अंतराळ संस्था नासाचा आहे. नासाने सी लेव्हल प्रोजेक्शन टूल तयार केले आहे. हे टूल IPCC अहवालात दिलेल्या माहितीनुसार कार्य करते. या अहवालात संपूर्ण जगाला उष्णतेचा तडाखा बसणार असल्याचे म्हटले आहे. कारण तापमान 4.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. पुढील दोन दशकांत तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZ2h0dHBzOi8vd3d3LnNhYW10di5jb20vbXVtYmFpLXB1bmUvZHVlLXRvLWNsaW1hdGUtY2hhbmdlLXdpbGwtbXVtYmFpLXNpbmstd2hhdC1pcy10aGUtZnV0dXJlLXJpc2stcHZ3ODjSAXFodHRwczovL3d3dy5zYWFtdHYuY29tL2FtcC9zdG9yeS9tdW1iYWktcHVuZS9kdWUtdG8tY2xpbWF0ZS1jaGFuZ2Utd2lsbC1tdW1iYWktc2luay13aGF0LWlzLXRoZS1mdXR1cmUtcmlzay1wdnc4OA?oc=5