मुंबई बातम्या

Indian Media : वृत्तपत्रांचे बदलते जग – Agrowon

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी चार वृत्तपत्रे दलितांना न्याय देण्यासाठी सुरू केली.

आचार्य अत्रे यांनी मराठा या दैनिकाद्वारे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रखरपणे चालवली. १९४८ मध्ये मुंबईहून लोकसत्ता हे दैनिक सुरू झाले. शिक्षणाचे प्रमाण जसे जसे वाढले तसे वृत्तपत्रांचा खप सुद्धा वाढू लागला. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली. १८७४ मध्ये महात्मा फुले व कृष्णराव भास्कर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. नागपूरमध्ये हितवाद हे साप्ताहिक सुरू झाले. शेती क्षेत्राला वाहिलेले ‘ॲग्रोवन’ हे दैनिक २००५ मध्ये ‘सकाळ समूहा’ने सुरू केले. स्वातंत्र्याच्या पूर्वी या वृत्तपत्रांचा खप काही हजारांमध्ये असे. रजिस्टर ऑफ न्यूज पेपर यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार २०२०-२१ मध्ये संपूर्ण भारतात ७५० वृत्तपत्रांनी २२ कोटी ५८ लाख प्रति दररोज छापल्याचे म्हटले आहे. त्या वर्षी १२.६० टक्के एवढी वाचकांच्या संख्येत घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्रांना देखील बराच आर्थिक फटका बसला.

Source: https://www.agrowon.com/agro-special/world-of-news-paper-changing