मुंबई बातम्या

मुंबईत दररोज ९०० दशलक्ष लिटर पाणी जाते वाया; ही धक्कादायक कारणे समोर – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या परिसरात समाधानकारक पाऊस होत असल्याने मुंबईकरांसमोरील पाणीटंचाईची भीती सरली आहे. मुंबई महापालिकेने पाणीकपातही मागे घेतली आहे. मात्र, दररोज २० ते २५ टक्के पाणीगळतीची समस्या अद्यापही कायम आहे. त्यामुळे दररोज ८०० ते ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे किंवा या पाण्याची चोरी होत आहे.

जलवाहिन्यांची वारंवार दुरुस्ती

– मुंबई पालिकेकडून दररोज ३,८५० दशलक्ष पाणीपुरवठा.

– त्यापैकी ८००-९०० दशलक्ष लिटर पाण्याची गळती.

– जलवाहिन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नगरसेवकांकडून मागणी.

– जलवाहिन्यांची वारंवार दुरुस्ती केली जात असल्याचे जल विभागाचे म्हणणे.

– जुन्या वाहिन्या बदलण्याचे कामही सातत्याने होत असल्याचा दावा.

– परिणामी जलवाहिन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वेळ येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे.

समान पुरवठ्याचे काय?

– सर्व मुंबईकरांना समान पाणीपुरवठ्याची मुंबई पालिकेतर्फे नुकतीच घोषणा.

– मात्र पाणीगळतीने होणाऱ्या नुकसानीवर कोणतीही ठोस उपाययोजना नाही.

– पालिका प्रशासन गंभीर नसल्याचा पालिकेचे माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांचा आरोप.

नियोजन आवश्यक

– दररोज ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाणे, हे भूषणावह नसल्याचे भाजपचे म्हणणे.

– प्रशासनाने पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी नियोजन करण्याची मागणी.

– जलवाहिन्या दुरुस्ती, नव्याने वाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

– या निविदा प्रक्रियेचे पुढे काय झाले हेदेखील पाहिले पाहिजे, अशी पालिकेतील भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांची प्रतिक्रिया.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/900-million-liters-of-water-is-wasted-in-mumbai-every-day/articleshow/92943068.cms