मुंबई बातम्या

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने एकही संधी का दिली नाही, जाणून घ्या मोठं कारण… – Maharashtra Times

मुंबई : मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला यावर्षी पुन्हा एकदा आपल्या संघात दाख करून घेतले. यावर्षी अर्जुनच्या सरावाचे बरेच व्हिडीओ चांगले व्हायरल झाले. याचाच अर्थ अर्जुन हा चांगला सराव करत होता. पण मुंबईच्या संघाने अर्जुनला यावर्षी एकही संधी दिली नाही. त्यामुळे अर्जुनबरोबरच चाहत्यांच्याही हिरमोड झाला असेल. पण मुंबईच्या संघाने अर्जुनला एकही संधी का दिली नाही, याचे कारणही आता समोर आले आहे.
मुंबईने अर्जुनला एकही संधी का दिली नाही, जाणून घ्या कारण…
गेल्यावर्षीच मुंबईने अर्जुनला आपल्या संघात दाखल करून घेतले होते. यावर्षी पुन्हा एकदा २० लाख रुपये मोजत त्याला मुंबईने आपल्या संघात स्थान दिले. मुंबई इंडियन्सचे सुरुवातीला जे पराभव झाले ते वाईट गोलंदाजीमुळे झाले. खासकरून मुंबईच्या संघातील वेगवान गोलंदाज हे चांगली कामगिरी करत नव्हते आणि त्याचा फटका मुंबईच्या संघाला बसत होता. त्यावेळी अर्जुनला संघात स्थान देण्याची चांगली संधी होती. पण तेव्हा अर्जुनला संघात संधी दिली नाही. त्यानंतर मुंबईच्या संघाला सलग ९ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघात प्रयोग करत होता आणि युवा खेळाडूंना संधी देत होता. त्यावेळीही अर्जुनला संघात देण्यात आले नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात तरी अर्जुनला संधी मिळेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण अखेरच्या सामन्यातही अर्जुनला संधी देण्यात आली नाही. या गोष्टींचे मोठे कारण आता समोर आले आहे. अर्जुनला जेव्हा २० लाख रुपये देत संघात स्थान देण्यात आले तेव्हा त्याच्यासहीत मुंबई इंडियन्सला चाहत्यांनी जोरदार ट्रोल केले होते. आयपीएलमध्ये पाऊल ठेवल्यापासून अर्जुनला ट्रोल केले जात आहे. त्यामुळे जर अखेरच्या सामन्यात जरी अर्जुनला संधी दिली असती आणि त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नसती तर त्याला वर्षभर ट्रोल केले गेले असते. त्याचबरोबर पुढचे आयपीएल सुरु झाल्यावरही त्याला टीकेचा सामना करावा लागला असता. त्यामुळे कदाचित मुंबईच्या संघाने त्याला संधी दिली नसल्याचे समोर येत आहे. यावर्षी मुंबईचा कामिगिरीही चांगली झालेली नाही. पण पुढच्या वर्षीसाठी त्यांनी आता जोरदार तयारी केली आहे आणि कोणत्या युवा खेळाडूंना घेऊन पुढे जायचे, हे त्यांना समजले असेल. त्यामुळे आता पुढच्या वर्षी त्यांना संघाची चांगली मोट बांधता येऊ शकते. त्यामुळे आता पुढच्या वर्षी अर्जुनला संधी देण्याचे मुंबई इंडियन्सने ठरवले असेल, असे वाटत आहे. त्यामुळेच अर्जुनला यावर्षी संधी दिली नाही आणि पुढच्या वर्षी सरप्राइज म्हणून त्याला संघात स्थान दिले जाऊ शकते.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/why-mumbai-indians-not-given-single-chance-to-arjun-tendulkar-in-ipl-2022-know-the-reason/articleshow/91724218.cms