मुंबई बातम्या

मुंबई पोलीस मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्यासाठी सक्षम नाही का? | अखिल चित्रे – Maharashtra Times

“शिवसैनिकांमुळे दोन दिवसांपासून सगळे रस्ता अडवला आहे.शिवसैनिकांच्या गोंधळामुळे वाहतूककोंडी होत आहे.असा आरोप मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे.तसेच “मुंबई पोलीस अशा गोष्टींना पाटबळ का देतायत?,मुंबई पोलीस मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्यासाठी सक्षम नाही का?,मुंबई पोलीस बेकायदेशीरपणे रस्ते अडवल्याबद्दल शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करणार का?”असे अनेक आरोप करत अखिल चित्रे यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दाणा दाम्पत्यानं मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली तेव्हापासून मातोश्री बाहेर सर्व शिवसैनिकांनी ठिय्याच मांडला होता. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीही झाली.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mns-on-mumbai-police/videoshow/91046138.cms