शारजा : मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा धक्का बसला. पण दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतरही आता मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण या गोष्टीमुळे आता मुंबई इंडियन्ससाठी प्ले-ऑफचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
मुंबईसाठी ही आनंदाची बातमी आहे तरी काय, पाहा…
मुंबईच्या संघाला आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. आता मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने जिंकले तरी त्यांचे १६ गुण होणार नाहीत, पण तरीही त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचता येऊ शकते. पण आता त्यांचे १४ गुण होऊ शकतात आणि त्यांना प्ले-ऑफमध्ये जाता येऊ शकते. पण या पराभवानंतरही त्यांच्यासाठी सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे रनरेट. कारण पराभवानंतर प्रत्येक संघाच्या रनरेटवर परीणाम होत असल्याचे पाहायला मिळते. पण मुंबई इंडियन्सचा दिल्लीविरुद्धचा सामना हा अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या रनरेटवर विपरीत परीणाम झाला नाही. त्यामुळे या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला दोन गुण मिळाले नसले तरी त्यांचा रनरेट जैथे थे, असाच आहे आणि हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू शकते. कारण आता विजयाबरोबरच प्रत्येक संघासाठी रनरेट सर्वात महत्वाचा असेल. त्यामुळे पराभवानंतरही मुंबई इंडियन्सच्या रनरेटवर मोठा निगेटीव्ह परीणाम न होणं ही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट ठरलेली आहे. पण मुंबई इंडियन्सला एवढ्यावरच थांबून चालणार नाही, तर त्यांना आता मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. आजचा सामना जर मुंबई इंडियन्सचा संघ जिंकला असता तर त्यांना १२ गुणांसह चौथ्या स्थानावर जाण्याची चांगली संधी होती, पण ही संधी मुंबई इंडियन्सने गमावली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला या आयपीएलमध्ये आता १६ गुण पटकावता येणारच नाही, ही गोष्टही स्पष्ट झाली आहे. १२ सामन्यांमध्ये मुंबईला ५ विजय आणि सात पराभव पत्करावे लागले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आता १० गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ आपला रनरेट कसा वाढवते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/good-news-for-mumbai-indians-after-defeat-from-delhi-capitals-no-changes-in-run-rate-after-losing/articleshow/86710216.cms