मुंबई बातम्या

CSK विरुद्धच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे प्लेऑफचे टेन्शन वाढले; उर्वरित ६ लढतीत हवेत इतके विजय – Maharashtra Times

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या सत्राला काल १९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. दुसऱ्या सत्रातील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाली. या सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला. मुंबई संघात रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे दोन खेळाडू नव्हते.

वाचा- Video: कॅप्टन कुल मैदानावर भडकला; या खेळाडूवर काढला राग

चेन्नई विरुद्धच्या सामन्यातील पराभवामुळे गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सच्या स्थानात फरक पडलेला नाही. पण ८ लढतीत ४ विजय आणि ४ पराभवासह त्यांचे ८ गुण झाले आहेत. मुंबईचे नेट रनरेट वजा ०.०७१ इतके आहे. प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी मुंबईला पुढील ६ पैकी ३ सामन्यात विजय मिळवावा लागले.

वाचा- मुंबई इंडियन्सवर मिळवलेल्या विजयानंतर जखमी खेळाडूंच्या बाबत आली मोठी अपडेट

मुंबई इंडियन्सच्या पुढील लढती

२३ सप्टेंबर- विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
२६ सप्टेंबर- विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
२८ सप्टेंबर- विरुद्ध पंजाब किंग्ज
०२ ऑक्टोबर-विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
०५ ऑक्टोबर- विरुद्ध राजस्थान रॉयल्स
०८ ऑक्टोबर- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

वाचा- त्या एका ओव्हरने चेन्नईला किक मिळाली आणि मुंबई इंडियन्सने मॅच गमावली

साखळी फेरीतील लढती झाल्यानंतर प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला किमान १४ गुणांची गरज लागेल. यासाठी त्यांना आणखी ३ विजय पुरेसे आहेत. पण आयपीएलचे ५ विजेते असलेल्या आणि गेल्या दोन हंगामात विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांची अपेक्षा असेल की किमान त्यांनी पहिले किंवा दुसरे स्थान मिळवावे.

वाचा- मुंबई इंडियन्सचे कुठे चुकले, यामुळे झाला पराभव; गायकवाडने केला विक्रम

पहिले किंवा दुसरे स्थान मिळवण्यासाठी मुंबईला सहा पैकी सहा किंवा ५ सामन्यात विजय मिळवावा लागले. आयपीएल २०२१ मध्ये मुंबई संघाला अद्याप हवा तसा फॉर्म मिळालेला नाही. पहिल्या सत्रात देखील संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2021-defeat-against-csk-increased-the-tension-of-the-mumbai-indians-need-3-victories-to-reach-playoffs/articleshow/86366767.cms