मुंबई बातम्या

Maharashtra SSC exam: दहावीच्या परीक्षा रद्द होणार की नाही, मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीकडं महाराष्ट्राचं लक्ष – TV9 Marathi

दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील धनंजय कुलकर्णींच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होत आहे. (Maharashtra SSC exam Bombay High Court)

Bombay High Court

मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं देखील दहावीच्या परीक्षा रद्द (Maharashtra SSC Exam) करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) या निर्णयास पुणे येथील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं. राज्य सरकारचा दहावी परीक्षेबाबतचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई हायकोर्टाचे (Bombay High Court) मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या समोर या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. (Maharashtra SSC exam Bombay High Court start hearing Live Updates on petition of Dhananjay Kulkarni to cancel state government decision on SSC exam)

सुनावणीकडे राज्याचं लक्ष

10 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी जनहित याचिका केली आहे. दहावीची परीक्षा घेण्यात याव्यात अशी कुलकर्णी यांची मागणी आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अध्यादेश काढून परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता.

दहावीच्या परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी या दोन न्यायमुर्तींसमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील रीशान सरोदे यानं दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे रीशान सरोदेच्यावतीनं बाजू मांडत आहेत. ऑनलाईन पद्धतीने सुनावणीला झाली सुरुवात झाली आहे.

कुलकर्णींच्या याचिकेवर इंटर्व्हेन्शन याचिका

बालहक्क कार्यकर्त्या अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी हाय कोर्टात कुलकर्णी यांची याचिका फेटाळून लावावी. राज्य सरकारचा निर्णय रद्द करु नये. जगभर कोरोनामुळे परीक्षा रद्द होत आहेत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर प्रमोट केल जातं आहे, असं अनुभा श्रीवास्तव यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे.

दहावीपेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या

शिक्षण विभागानं हायकोर्टात प्रतित्रापत्र सादर करुन दहावीचा निकाल जाहीर करण्यासंबधी निकष आणि सरकारची बाजू कोर्टात मांडली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये फरक असतो. दहावी पेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या असतात, अशी बाजू सरकारनं मांडली आहे.

दहावीच्या परीक्षा घेणं शक्य नाही

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता. तसंच आपली बाजू मांडण्याचे आदेशही शिक्षण विभागाला दिले होते. त्याबाबत राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. 10 वी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.

संबंधित बातम्या:

SSC exam: दहावीपेक्षा बारावीच्या परीक्षा महत्वाच्या, हायकोर्टात राज्य सरकारचं प्रतित्रापत्र, आज सुनावणीची शक्यता

मोठी बातमी, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडली, बारावी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार?

(Maharashtra SSC exam Bombay High Court start hearing Live Updates on petition of Dhananjay Kulkarni to cancel state government decision on SSC exam)

Source: https://www.tv9marathi.com/education/maharashtra-ssc-exam-bombay-high-court-start-hearing-live-updates-on-petition-of-dhananjay-kulkarni-to-cancel-state-government-decision-on-ssc-exam-467802.html