मुंबई, कोकणावर ढगांची गर्दी; पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट& | & फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
- सध्या अरबी समुद्रात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
- हा अलर्ट पुढच्या ३-४ तासांसाठी असल्याचे हवामान खात्याने ट्विट करून सांगितले आहे.
- या काळात दक्षिण मुंबई, रायगड आणि तळ कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : सध्या अरबी समुद्रात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट पुढच्या ३-४ तासांसाठी असल्याचे हवामान खात्याने ट्विट करून सांगितले आहे. या काळात दक्षिण मुंबई, रायगड आणि तळ कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना हवामान खात्याने सतर्क राहण्याच्या सूचना आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिला आहे.
अरबी समुद्रात ढगांची दाटी…
as seen from Latest satellite high resolution image and Mumbai radar. Raigad, South Mumbai cloudy. Possibilities of rains next 3,4 hrs.
Konkan region; clouds building up as expected. Possibilities of heavy rains. pic.twitter.com/pzlxz4NZTL— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 22, 2020
मुंबई ड़ॉपलर रडार
पावसाने भरलेले ढग हे दक्षिण आणि उत्तर कोकण, रायगड, मुंबई, ठाणे आणि अरबी समुद्रावर पसरले आहे. या ढगांची उंची ५ ते १० किलोमीटर उंचीचे असण्याची शक्यता आहे.
Mumbai Doppler Radar:
Cloud bands moving south to north over Konkan region over Raigad, Mumbai, Thane and also over Arabian sea. Cloud height varying from 5 to 10 km. pic.twitter.com/gZPHpCjvzs— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 22, 2020
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. सायंकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच अनेक ठिकाणी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. विदर्भातील काही भागात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाल्याने सोयाबीनच्या शेंगा सडल्या आहेत. बीड जिल्ह्यात झालेल्या भीज पावसामुळे नदी,नाले आणि ओढ्यांचे पाणी शेतात घुसले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास नेला आहे. कापूस, सोयाबीन पीकांचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ४५०० मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. ढगाळ वातावरणामुळे सुपारी पिकांचे नुकसान झाले आहे. सुपारी पिकांची फळगळती झाली आहे.
Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-weather-forecast-imd-predicts-heavy-rainfalls-next-3-to-4-hrs-in-kokan-and-mumbai/313890