मुंबई बातम्या

मुंबई, ठाण्यात तांदळासोबत मोफत डाळ वाटप सुरु – Zee २४ तास

मुंबई : राष्ट्रीयअन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) तसेच एपीएल ( केशरी ) शिधापात्रिकाधारक यापैकी एकही शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वचिंत राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आता मुंबई आणि ठाण्यात मोफत डाळ वाटप करण्यात येत आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी  शिधावाटप दुकाना समोर गर्दी करु नये, असे आवाहन मुंबईचे  शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा नियंत्रक कैलास पगारे यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रतिमाणसी दोन रुपये किलो दराने गहू आणि रुपये तीन प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये प्रति दराने तांदूळ वितरित करण्यात येत असून आतापर्यंत ५१ टक्के शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी पाच किलो मोफत तांदळाचे मे महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह एक किलो डाळ या परिमाणात ( तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत ) माहे एप्रिल आणि मे महिन्याची एकूण दोन किलो मोफत डाळीचे वाटप मंगळवारपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती कैलास पगारे यांनी दिली आहे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ५९००० पेक्षा जास्त आणि रुपये एक लाखापर्यंत असणाऱ्या एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना गहू आठ रुपये प्रति किलो आणि तांदूळ  १२ रुपये  प्रति किलो या दराने प्रति माह प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ याप्रमाणे  पाच किलो अन्नधान्याचे मे महिन्याचे वितरण  २४ एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. या अन्नधान्याचे वितरण मे महिन्यातही सुरु राहणार आहे. आतापर्यंत तांदूळ २४९४ मेट्रिक टन आणि गहू ३४४३ मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचे २० टक्के शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती कैलास पगारे यांनी दिली आहे

तक्रार असल्यास हेल्पलाईन

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या http : //mahaepos.gov.in या वेबसाइट वरील Rc Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी . याबाबत तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२ – २२८५२८१४ तसेच ई – मेल क्रमांक dycor.ho.mum @ gov.in यावर तक्रार नोंदवावी. जर अधिकृत शिधावाटप दुकानदाराने त्यानुसार अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरूध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/distribution-of-free-rice-and-dal-started-in-mumbai-and-thane/519940